नांदेड: २९ प्रतिनिधी माधव वाघमारे
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी आक्रमक पाऊले उचलली आहेत. ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ अन्वये तडीपारीची कारवाई करण्यात आली असून, त्यांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
टोळीतील ‘या’ दोघांवर झाली कारवाई
नांदेड ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावानुसार, खालील दोन सराईत गुन्हेगारांना जिल्ह्याबाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत:
१) मोहम्मद रिझवान कुरेशी मोहम्मद खाजा कुरेशी (वय ३० वर्षे, रा. हजरतअली मशीद जवळ, हिलालनगर, नांदेड).
२) शेख सोहेल शेख रफीक कुरेशी (वय २३ वर्षे, रा. जवळा बाजार, ता. औंढा, जि. हिंगोली, ह. मु. इक्बालनगर, नांदेड).
कारवाईची पार्श्वभूमी
पोलीस अधीक्षक अभिनश कुमार यांनी पोलीस ठाणे हद्दीत वारंवार गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या पथकाने या टोळीविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला होता. दि. २७ मार्च २०२६ रोजी पोलीस अधीक्षकांनी या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करत संबंधित इसमांना सहा महिन्यांसाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश निर्गमित केले.
या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनश कुमार, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक (नांदेड) श्री. सूरज गुरव, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (इतवारा) श्री. प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या पथकात पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, शिवानंद तेजबंद, माधव पालीमकवार आणि समीर अहमद यांचा समावेश होता. पोलीस अधीक्षकांनी या कामगिरीबद्दल संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले आहे.












